*नुकसानग्रस्त शेतकरी आणि घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना मनसेच्या वतीने प्रत्येकी रोख  दहा हजार रुपयाची मदत* *संकट काळात कायम पुढे असणारे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केली तातडीने मदत*

 *नुकसानग्रस्त शेतकरी आणि घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना मनसेच्या वतीने प्रत्येकी रोख  दहा हजार रुपयाची मदत*  *संकट काळात कायम पुढे असणारे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केली तातडीने मदत*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि गोरगरीब कुटुंबांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची डाळिंब, द्राक्ष, मका,उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य, खाण्याच्या वस्तू, किराणामाल यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे,घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपयाची रोख मदत मनसे नेते दिली बापू धोत्रे यांच्या वतीने करण्यात आली.


 यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे,शहर संघटक गणेश पिंपळनेरकर,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,उपतालुकाध्यक्ष लखन घाडगे, तपकिरी शेटफळ येथील मनसे शाखाध्यक्ष नवनाथ पळसे,अण्णा कांबळे,आकाश बंदपट्टे चारही उपस्थित होते.