*शेळवे येथील कसाळगंगा ओढ्यावर  उंचीचा पुल आवश्यक* *शेळवे गावचे पोलिस पाटील अँड नवनाथ पाटील यांची सरकारकडे मागणी*

*शेळवे येथील कसाळगंगा ओढ्यावर  उंचीचा पुल आवश्यक*  *शेळवे गावचे पोलिस पाटील अँड नवनाथ पाटील यांची सरकारकडे मागणी*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 पंढरपूर  पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावर सध्या जो पूल आहे.त्याची उंची कमी आहे.यामुळे लवकरच तो पूल पाण्याखाली जावून वाहतूक बंद होते.यामुळे या भागातील दळणवळ बंद पडत आहे. यासाठी नवीन आणि उंचीचा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे . तरी याबाबत सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी शेळवे गावचे पोलीस पाटील अँड नवनाथ पाटील यांनी केली आहे.
       शेळवे येथील या कासाळगंगा ओढ्यावर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर, पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर ,भीमा नदीच्या पाणीपत्रात वाढ झाल्यानंतर ,भीमा नदीच्या बॅक वॉटरमुळे हा शेळवे येथील कासळगंगा पूल लगेच पाण्याखाली जातो. तसेच कासाळगंगा ओढ्यावरील पाणलोट क्षेत्रामध्ये कटफळ ,महूद, भाळवणी, गार्डी, जैनवाडी, धोंडेवाडी, उपरी ,पळशी, सुपली, भडीशेगाव ,शेळवे,  वाडीकुरोली येथे पाऊस झाल्यानंतरही हा पूल पाण्याखाली जातो .त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करावी लागते. त्याकरिता या ओढ्यावरील अधिकच्या उंचीचा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे  या पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर या पुलावरून येणारे हजारो शेतकरी यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद होतो .या पुलावरून येना जाणारे नांदोरे ,नेवरे ,तरटगाव ,शेवते, पटवर्धन कुरोली ,पिराची कुरोली ,देवडे ,खळवे ,जांभूळ, शेळवे, वाडीकुरोली तसेच नदीकाठच्या अनेक भागातील शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद होतो .
या पुलाचा वापर शेतकरी भाजीपाला पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी तसेच फळबाग शेतकरी पंढरपूरला मार्केट कमिटी कडे जाण्यासाठी तसेच जनावरांच्या वैरणीसाठी या पुलाचा उपयोग  होतो. परंतु या पुलावरती पाणी आल्यानंतर वाहतूक बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .तसेच शेळवे, वाडीकुरोली ,पटवर्धन कुरोली, नांदोरे, पिराची कुरोली, या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था आहेत .या शिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ते विद्यार्थीही या पुलाचा वापर करतात. पुलावरील वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांचेही शैक्षणिक नुकसान होते .या पुलावरती पाणी आल्यानंतर अनेक मंत्री खासदार आमदार महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी प्रशासनातील पोलीस निरीक्षक यांनी अनेक वेळा भेटी दिलेले आहेत. ग्रामस्थांना या पुलाबाबत अनेक वेळा आश्वासनही देण्यात आलेली आहेत. तरी पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावरील पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. असेही शेळवे गावचे पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.