*महापुरुषांच्या चरित्रामुळे लढण्याची प्रेरणा मिळते - अनंत करमुसे*
पंढरपूर /प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार करमुसे यांना प्रदान
पंढरपूर दि. 20-महापुरुषांच्या चरित्रामधुन लढण्याची प्रेरणा मिळते. असे उदगार ठाणे येथिल शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे प्रमुख कार्यकर्ते अनंत करमुसे यांनी काढले. पंढरीतील थोर क्रांतिकारक, गोवा मुक्ति संग्रामातील अग्रणी, क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या 36 व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार करमुसे यांना यावेळी प्रदान करणेत आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश हिंदुसभेचे अध्यक्ष अनिल पवार होेते. तर आशिर्वाद देणेसाठी ह.भ.प. ओंकार संतोष बाबा, वडगावकर महाराज,रामकृष्ण महाराज वीर उपस्थित होते. यावेळी हिंदुसभेचे जेष्ठ नेते अनिलकाका बडवे, अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे, बाळाराव डिंगरे, प्रशांत खंडागळे, दिपक कुलकर्णी, पंडित भोले पुणेकर,शाम हिवरकर, गणेश लंके, मयुर बडवे, श्रीराम बडवे, महेश खिस्ते, तुकाराम चिंचणीकर, सौरभ थिटे पाटील आणि शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होतेे.
प्रथम क्रांतिवीर वसंत दादा बडवे ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी हा पुरस्कार देण्यामागची भुमिका विषद केली. राज्यामधे जी मंडळी हिंदुत्वाचे लढावू काम करतात त्यांना दादांच्या नावाचा शौर्य पुरस्कार जणु श्री विठोबाचा आशीर्वाद म्हणून प्रदान करणेत येतो. याआधी दैनिक सनातन प्रभात,मिलींद एकबोटे , संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, हिरामण अप्पा गवळी,विकास सुर्यवंश,समिर दरेकर, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालीक, सुप्रसिध्द कन्नड साहित्यीक म्हैसुरचे एस्. एल. भैरप्पा, धनसिंंंंंंंंंंंंंंंंंंंह सुर्यवंशी, अभय वर्तक, चंद्रकांत सहासने,शिवशंकर स्वामी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, संजय साळुंखे.,गोरक्षक सुधाकर बहिरवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला होता. आता यामधे या लढावु कार्यकर्त्याला हा पुरस्कार देताना आम्ही योग्य निवड केल्याचा आनंद होत आहे. असे सांगुन ते यावेळी बोलताना म्हणाले की, अनंत करमुसे यांनी राज्यातील जितेंद्र आव्हाड या मंत्र्याला अटक करावयास राज्य शासनाला भाग पाडले. यामुळे जर मनापासुन लढले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. महापुरुषांनी आपल्या समोर आदर्श ठेवले आहेत. त्यांचीच प्रेरणा घेउन जर काम केले तर यश आपलेच आहे. तर यावेळी महाराज मंडळींनी आशिर्वाद दिले.
यावेळी बोलताना इचगावकर पुढे म्हणाले की, अनंत करमुसे यांना राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयावरुन टिका केली याकरीता आपल्या बंगल्यावर नेउन मारहाण केली होती. या प्रकरणात करमुसे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने मंत्री आव्हाड यांना अटक करण्याचा हुकुम सोडला होता. त्याप्रमाणे आव्हाड यांना अटक होउन ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात करमुसे यांना मोठा त्रास सोसावा लागला आहे. हिंदुत्वाचे काम करताना असे अडथळे येतात. जर मनापासुन लढले तर यश येते. हेच यामधुन सिध्द होते. असेेही इचगावकर यांनी सांगीतले.
यानंतर क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करणेत आले. शाल, श्रीफळ, हार, मानपत्र, आणि 11 सहस्त्र रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार देताना छ. शिवाजी महाराजांचा उदघोष करणेत आला. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी निवेदिता करमुसे यांचाही सत्कार माजी नगरसेविका वैष्णवी बेणारे आणि वसुजा कुलकर्णी यांचे हस्ते करणेत आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना करमुसे म्हणाले की, मी भिंडे गुरुजींचा शिष्य आहे. त्यांनीं आम्हाला छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराजांची चरित्रे सांगुन आमचा पिंड घडविला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढण्याची प्रेरणा मिळते. आव्हाड यांना मी उत्तर दिले याकरीता त्यांनी माझी पाठ सोलून काढली. पण मी घाबरलो नाही तर लढण्याचा निश्चय केला. हे करत असताना काही वेळा वकिलही विकले गेले. पण याही परिस्थितीतुन मार्ग काढून आव्हाड यांचेवर केस करुन त्यांना अटक करणेसाठी भाग पाडले. यामधे देशासाठी काम केलेल्या सर्व महापुरुषांचीच प्रेरणा आहे. असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक बेणारे यांनी केले. तर गीत गायनाचे काम तुकाराम चिंचणीकर यांनी केले. शेवट आभाराचे काम मयुर बडवे यांनी केले. यावेळी मुलतः कॅथालिक गोवेनिज ख्रिश्चन असुन श्री विठ्ठल भक्तिमुळे 35 वर्षांपुर्वी हिंदु धर्म स्विकारलेले,आणि दिनदलित वर्गात हिंदुत्वाची पताका सदैव तेवती ठेवलेले ह.भ.प. ओंकार बाबा यांचाही यथोचित सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास हिंदुत्वनिष्ठ नागरीक उपस्थित होते.