*वीर धरणातून वाहून जाणारी पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूरला द्या* *पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांची मागणी* *पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिले निवेदन*

पंढरपूर /प्रतिनिधी
सध्या वरच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामधून वीर धरणातून नीरा नदीतून वाहून जात आहे. हेच पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्याला मिळावे. यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यामध्ये नीरा उजवाकालव्याद्वारे रांझणी, अनवली, एकलासपूर, तावशी, उंबरगाव, बोहाळी, कासेगाव, कोर्टी, टाकळी, वाखरी, इसबावी, खर्डी, त. शेटफळ, तनाळी, गादेगाव व तिसंगी मध्यम प्रकल्पास लाभ मिळतो. परंतु तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून, मी फोनद्वारे, पत्राद्वारे व पाणी वाटप नियोजन बैठकीदेखीलबऱ्याच वेळा पाणी देण्याबाबत मागणी केली होती परंतु धरणात पाणी कमी असल्याने व अधिकाऱ्याच्या योग्य नियोजन आभावी शेतकऱ्यांना पुरेसे प्रमाणात पाणी मिळाले नाही. तसेच गादेगाव, वाखरी, कोर्टी, बोहाळी, टाकळी व उंबरगाव या सहा गावांना शेवटचे अवर्तन मिळाले नसल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेतरी या सहा गावांना प्राधान्याने पाणी मिळावे. आता पावसाळा सुरु असून वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. नीरा नदी दुथडी भरून वाहत असून पूर परस्थिती निर्माण होत आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील काही भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे.
तरी नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे आमच्या भागात दिले तर,या भागातील लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घेता येतील. या भगातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तरी वीर धरणातून नीरा नदीतील वाहून जात असलेले पाणी, नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्याला देण्याबाबत तत्काळ आदेश देण्यात यावेत.अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी केली आहे.